Posts

Showing posts from November, 2008

माझा एकांत आणि मी…

आजकाल इथं आम्ही दोघंच असतो .. माझा एकांत आणि मी. आजकाल तसं दुस-या कुणाशी फारसं पटत नाही.. तासन तास दोघं बोलत बसतो, निश्चल अंधाराच्या काठाशी, कधी मनात जपलेल्या वाटांशी.. पहाटे.. किरकिरं घड्याळ तुझी स्वप्नं गढूळ करतं, माझ्यासारखाच तेव्हा तोही चिडतो. मग मी घड्याळाला गप्प करतो. ‘आता स्वप्नांतही भेटणं नाही’, असंच काहीसं बडबडतो.. खिडकीचा पदर बाजूला सारतो, तिच्या डोळ्यांतलं चांदणं हसतं… तेव्हा त्याला मी हळूच सांगतो की ‘तिच्या’ डोळ्यांतही असंच काहीतरी असतं. तुझ्या डोळ्यांत हरवलेल्या मला तो पुन्हा मागे खेचतो.. मी पापण्यांतले थेंब वेचतो..

प्रेम

प्रेम करतोस ना तिच्यावर, मग कर फ़क्त प्रेमाचा वर्षाव, तिने ही कराव प्रेम म्हणून आणायचा नसतो दबाव.... असेल तिचा नकार, तर तो हि तू हसत स्विकार, तिलाही आहे ना स्वत:चा निर्णय घेण्याचा अधिकार... नाही म्हणाली तर तूझ्या प्रेमाने नकाराला होकारात बदल, का नाही म्हणाली याचा विचार करुन आधी स्वत:ला बदल... नाही म्हणाली तर तिच्या नकारावरही प्रेम कराव, नाही म्हणता म्हणता तिला प्रेम करायला शिकवाव... नको रे घेउस तूझ्या वेड्या हट्टा पाई तिचा बळी, काय मिळणार तूला तोडून एखादी उमलणारी कळी... खरे प्रेम करतोस ना, मग ठेव सच्ची निती, कशाला दाखवतोस उगाच तिला जिवाचि भिती... तूझे हे सच्चे रुप पाहून कदाचित बदलेल तिचा विचार, तिलाही होईल बघ मग तुझ्या प्रेमाचा आजार... अखेर तरीही नसेल तिचा होकार तर तूही घे अवश्य माघार, कशाला मांडतोस लेका असा एकतर्फी प्रेमाचा बाजार...

स्वप्ने

स्वप्ने ही आपलीच असतात ह्र्दयात त्यांना जपायची असतात फुलांसारखी फुलवायची असतात घरांसारखी सजवायची असतात कारण स्वप्ने आपलीच तर असतात रेशीम बंधाने त्यांना बाधायची असतात मनातल्या मंदीरात पुजायची असतात कधी कधी अश्रुंच्या पुरात वाहुन द्यायची असतात आठवणींच्या जगात कोठेतरी साकारायची असतात पुर्ण झाली नाहित तरी शेवटी स्वप्ने ही आपलीच असतात ह्र्दयात त्यांना जपायची असतात..........

अशी असावी ती

अशी असावी ती नाही भेटलो मी दिवसभर तर तीने खुप बैचेन व्हावं संध्याकाळी ऒफ़िसबाहेर भेटून मला अगदि सरप्राईज द्याव भेटण्यासाठी ठरलेल्या जागी तीने माझ्या आधी यावं आणि मी उशिरा आलो म्हणुन मग लटके लटकॆ रागवावं फ़िरताना जर मी नजरेआड झालो तर तीने कावरबावरं व्हावं आणि मी दिसल्यावर मात्र अश्रू लपवत मला प्रेमान ओरडावं माझं काही चुकलं तर तीन कधीही न रागवावं अबोला धरुन मला न रडवता काय चुकलं ते समजवावं जीची कल्पनाही केली इतकी भरभरुन प्रेम देणारी ती व्यक्ती असावी माझी आठवण आली तीला की तिनंही माझ्यासाठी एक कविता लिहाव