आपुलाच वाद आपणाशी . . .

निसटून गेलेले क्षण
येत नाहीत परत ...
आपण त्यांच्या मागे
धावतो खुळ्यागत .....

पळत सुटलो तरी
नाही काही हाती लागत ...
आपण मात्र एकटेच
बसत बसतो कुढत ....

उद्विग्न होता आपण
सारे दूर पळतात...
दुरावा आला म्हणजे
संवाद ही हरवतात ....

आपल्या मनाचा आवाज
ऐकता आला पाहिजे ...
उत्स्फुर्तता टिकवून
स्वसंवाद झाला पाहिजे ....

मन व शरीर यांच्या
संवेदना जाणवू या...
स्वत:ला व्यक्त करण्यास्तव
कामास त्यांना लावू या....

Comments

Popular posts from this blog

डोळ्यातील अश्रू पडतात

अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....