जेव्हा मला कोणी माझ्यासार्खा भेटतो

जेव्हा मला कोणी माझ्यासार्खा भेटतो,

मला कधी कळलच नाही
की नेमक मला दुख कशाच आहे?
ती मला सोडुन गेली याच्..की
ती मला सोडुन गेली म्हनुन मला
दुख झाल हे जगाला कळल नाही याच….

मेलेल्या बापालाही काही काळानंतर,
माणुस विसरतोच ना….
मग पहिल प्रेम विसरण कठिण का??
कदाचित आपल्यालच ते विसरायच नसत

सतत वाटत असत की सर्वाना कळाव,
मी किती सहन केलय मी चांगला आहे..
प्रश्न ही माझाच असतो आणि
उत्तर ही माझेच……

फक्त मी त्या व्यक्तीच्या शोधात असतो
जो मला हव ते उत्तर सांगेल…………
जेव्हा मला कोणी माझ्यासार्खा भेटतो,
तेव्हा वाटत चला कुणीतरी मला समजत.
किंबहुना …………………..
त्यालाही तसच वाटत असेल..

वाक्यही एकच असत आणि विचारही एकच असतात,
फक्त ते वेगवेगळ्या ओठांतुन निघतात बस एवढेच……….

Comments

Popular posts from this blog

डोळ्यातील अश्रू पडतात

अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....