असे जगावे दुनियेमधे, अव्हानांचे लावुन अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर. . . नको गुलामी नक्षत्रांचि, भिती आंधळी तऱ्यांची, नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर. . . असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर. . . पाय असावे जमीनिवारती, कवेत अंबर घेताना, हसु असावे ओठांवरती, काळीज काढुन देताना . . . संकटासही ठनकावुन सांगावे, आता ये बेहत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर. . . करुन जावे असेही काही, दुनियेतुनि या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवटाचा देताना . . . स्वर कठोर त्या कळाचाहि, क्षणभर व्हावा कातर - कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर. . . - विंदा करंदीकर
कारण हे वयच असं असतं....
Popular posts from this blog
डोळ्यातील अश्रू पडतात
तेव्हा त्यांचा आवाज होत नाहि याचा अर्थ असा नाहि की तु दुरावल्यावर मला दुःख होत नाहि शब्दांनाहि कोड पडावं अशीही काही माणस असतात किती आपलं भाग्य असत जेव्हा ती आपली असतात कुणीच आपल नसतं मग आपण कुणासाठी असतो आपलं हे क्षणिक समाधान इथ प्रत्येक जण एकटा असतो डहाळीवरूण ओथंबणारे पावसाचे थेंब उगाचच का अडकून बसतात काहि क्षण फ़ाद्यांशी नातं जोडून किती निष्ठूरपणे सोडून जातात नजरेत जे सामर्थ्य आहे ते शब्दांना कसे मिळणार पण प्रेमात पडल्याशिवाय ते तुम्हाला कस कळणार जिवनात काहितरी मागण्यापेक्षा काहितरी देण्यात महत्व असत कारण मागितलेला स्वार्थ अन दिलेलं प्रेम असतं शब्दांनी कधितरी मझी चौकशी केली होती मला शब्द नव्हे त्यामागची भावना हवी होती स्वप्नातील पावलांना चालणे कधी कळलेच नाहि पाऊलवाट चांगली असली तरी पाऊल हे वळलेच नाही अस्तित्वाची किंमत दूर गेल्याशिवाय कळत नाही, सगळ कळतय मला पण तुला सोडून दुरही जाववत नाही कधी कधी जवळ कुणीच नसावसं वाटतं आपलं आपण अगदी एकट असावसं वाटत....
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....
गंध आवडला फुलाचा म्हणून फूल मागायचं नसतं अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं.... परक्यांपेक्षा आपलीच माणसं आपल्याला नेहमी दगा देतात एकमेकांच्या पाठीवर मग् नजरे आडून वार होतात भळभळणा-या जखमेतून विश्वास घाताचं रक्त वाहतं छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा आपणच पुसायचं असतं अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं.... आपलं सुःख पाहण्याचा तसा प्रत्येकाला अधिकार आहे.. पण्; दुस-याला मारुन जगणं हा कुठला न्याय आहे... माणूस म्हणुन माणसावर खरं प्रेम करायचं आपल्या साठी थोडं, थोडं दुस-यासाठी जगायचं जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं.... आपल्याला कोणी आवडणं हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं आकर्षणाचं स्वप्नं ते आकर्षणंच असतं... मान्य आहे, आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं... पण् जे चकाकतं ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं मन् आपलं वेडं असतं वेडं आपण व्हायचं नसतं.. मन मारुन जगण्यापेक्षा वेळीच त्याला आवरायचं अशावेळी.... आणि अशाच वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....
Comments