Posts

Showing posts from 2009

तो फ़क्त एक क्षण

तो फ़क्त एक क्षण भान हरवून गेला हरलो पण तो मला जिंकवून गेला पावसाचं काय, तो नेहमीच येतो प्रेमाचा एकच थेंब चिंब भिजवून गेला चांदण्यातही आता मला तीच दिसते जणू तो चंद्र मला फ़सवून गेला देवळातही दुसरं काही मागवेना नास्तिकाला तो श्रद्धाळू बनवून गेला मी फ़क्त एक साधा चित्रकार होतो अद्रुश्य रंगात मला तो रंगवून गेला शब्द सुद्धा अपुरे पडू लागले मनाला घातलेला बांध तो उसवून गेला..

वेळच नसतो...

मनाप्रमाणे जगण्यासाठी वेळच नसतो मला, स्वप्नही बघण्यासाठी वेळच नसतो... वसंत येतो, श्रावण येतो अनेकदा; पण फुलण्यासाठी, भिजण्यासाठी वेळच नसतो... ओळख असलेलेच भेटती लोक मला, पण बघून 'त्यांना' हसण्यासाठी वेळच नसतो... प्रेम कुणीही का माझ्यावर करीत नाही? प्रेम कुणा का करण्यासाठी वेळच नसतो?... नशिबी असते जे-जे, घडते ते-ते तेव्हा नशिबी माझ्या 'घडण्यासाठी' वेळच नसतो... 'अजब' चालली कशाला पुढे इतकी दुनिया? कुणास मागे वळण्यासाठी वेळच नसतो...

प्रिय मनास

आठवतो आपला श्वास जसा एकमेकांत मिसळला होता भर दुपारच्या रखरखत्या ऊन्हात कसा चांदण्यांचा पाऊस कोसळला होता वाटलं नव्हतं ह्रुदय तुटलं तर इतकं दुःख सोसावं लागेल आज पर्यंत श्वासांनी मला, पण यापुढे त्यांना पोसावं लागेल तुझ्या आठवणींच्या साखर झोपेत माझी कालची रात्र गोडव्यात सरली पुर्वी स्वप्नांच्या जत्रेत मन जायचं, पण काल स्वप्नांनीच मनात जत्रा भरली 'प्रेम' ..... शब्ध दोन अक्षरांचा नुसता ऐकला तरी हर्ष होतो आणि ऊच्चारला तर दोन ओठांमध्ये स्पर्श होतो तुझ्या डोळ्यातील इवलासा अश्रू आज मला समुद्राहून खोल वटला कारण मीचं होतो म्हणून माझ्या डोळ्यात समुद्र दाटला माझं दुःख बघवलं नाही म्हणून एक ढग रडत होता तुमचं आपलं काहीतरीचं म्हणे तेंव्हा पाऊस पडत होता

माझे जरा ऐकशील का ?

माझे जरा ऐकशील का खरच मी इतका वाइट आहे का जे तु मला असे एकटे सोडून गेलीस खरच मी इतका वाइट आहे का जे तु मला असे एकटे सोडून गेलीस तुल आठावतात ते दिवस ज्यावेळी माझ्याविना एक क्षण सुद्धा तुला वर्षासारखा वाटायचा तुल आठावतात ते दिवस ज्यावेळी माझ्यासोबत मिलनारा सुखाचा एक कण सुद्धा तुला तुझ्या उत्कर्षासारखा वाटायचा तुल आठवतय तु मला म्हणाला होतास तु फ़ार सुन्दर हसतोस , हसल्यानन्तर तु फ़ारच सुन्दर दिसतोस माझे ते हसणे , ते दिसणे सारे कसे कोमेजुन गेलय तुझ्याविना तुझ्यावर प्रेम केले हाच तर माझा गुन्हा जसे तुझा मझ्याकडे येणे अशक्य आहे तसच तुझ्याविना माझे मरण हे लख्ख आहे शेवटचीच का होइना पण प्रेमाची साद देशील ना मझ्या प्रेतयात्रेला नाहि तरी तेराव्याला येशील ना ............

माझी होशील का ? ..

बस एकदा हो म्हणून, मज तू वरशील का आज माझी , फ़क्त माझीच , सखये होशील का चंद्र,सूर्य,ताऱ्यांवर नसेल माझं वर्चस्व बाकी काही माग तू,आणेन विकून सर्वस्व या गोड व्यवहारात माझं हृदय मागशील का म्हणतात लोकं ,प्रेम आंधळं असतं खरं तर ते जग या जगावेगळं असतं माझ्या डोळ्यातून हे स्वप्नाळू जग पाहशील का भरल्या घरात मनाची सुनी ओसरी खुदकन हसवतात तुझी स्वप्नं बावरी इवल्याशा या आभाळभर जागेत राहशील का हे रेशमी केस,गालावरची अवखळ खळी मुग्ध बडबडती जिवणी,वेड लावते मुळी या रुपचंद्राने माझं आकाश पूर्ण करशील का काहीही लिहतोय मी , जे सुचतंय ते शब्द आता रागवलेत , त्यांना बोचतंय ते शब्दांना माझ्या हसवण्यासाठी येशील का

आपण साले आयुष्यभर मूर्खच राहिलो...

आपण साले आयुष्यभर, मूर्खच राहिलो हाक आल्या क्षणाला, वेड्यासारखे धावलो लोकांनी आपले सगळी, कामं साधून घेतली आणि आपल्या वेळेला मात्र, सहज पाठ फिरवली झगडत राहिलो, लढत राहिलो, त्यांच्यासाठी करत राहिलो आपण साले आयुष्यभर, मूर्खच राहिलो... तूच रे तूच, कायम आपला दोस्त तुझ्यासोबत मित्रा आपण, दंग आयुष्यात मस्त शब्दांमधून प्रेम आणि, पाठीवर एक थाप फक्त प्रसंग आला की सगळ्यांचं प्रेम, वाऱ्यासोबत उडून जातं आपण त्यांच्या साथीसाठी, वाट कायम पाहत राहतो मनामध्ये कल्पनांचे, अनेक मनोरे बांधत राहतो एका क्षणाला वाटतं मग, आपण खरंच फसलो आपण साले आयुष्यभर, मूर्खच राहिलो... असल्याक्षणी आपल्या वाट्याला , फक्त मनस्ताप येतो विचारांचा अवास्तव गोंधळ, मनामध्ये माजतो आपले मित्र म्हणता म्हणता, सगळेच काम साधतात वेळ सरली की सहज, आपल्याला बाजूला सारतात मग वाटत राहतं "आपण का नाही असे कधी वागलो?" हिशोबांच्या या दुनियेत, इतके बेहिशोबी ठरलो आपण साले आयुष्यभर, मूर्खच राहिलो.... मित्र मित्र म्हणणारे, सिगारेटच्या धुरासोबत उडून जातात ओंजळीतल्या वाळूसारखे, नकळत निसटून जातात मग विचार येतो मनात, आपण नक्की काय क...

माझी जीवनाची नवीन सुरुवात

आयुष्य नवीन जगायच मला जून आहे ते विसरायचे मला विचारतात सगळे बदलतोस कशाला कस सांगू डोळे साथ नाही देत रडायला आयुष्य............ ......... . रडून- रडून डोळ्यांचे वाळ्वंट झाले जिवनाचे जगंल हि ओसाड झाले आता.... मरण्याचे हि सर्व प्रयत्न फसले नशिब थोडे . म्हणून हे आता मला सुचले आयुष्य............ ......... . आयुष्य आता किती माझे राहिले ना ते कोणी पाहिले जिवनात माझ्य मला एक समझले फक्त मि रडलो माझ्यवर सगळे हसले आयुष्य............ ......... . हसायला आता मि सुद्धा तयार आहे मन सावरले सर्व हिरवे रान आहे आता मलाच माझा अभिमान आहे नवीन आयुष्यात मला समाधान आहे आयुष्य............ ......... . सर्वांसाठी जगून काय भेटत असत? रोजच्या "मड्याला" तरी कोण रडत असत प्रत्येक क्षणि जग बदलेले असत आत आपण आपलच बघायचे असत आयुष्य............ .........

एकदा तरी प्रेम करून बघ…

Image
एकदा तरी प्रेम करून बघ… सगळ काही पाहिल असशीलच मग एकदा प्रेम करून बघ.. एकटच काय जगायच..? आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघ.. खुप वेळ असेल तुझ्याकडे.. आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघ.. कविता नुसत्याच नाही सुचणार… त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघ.. खुप छान वाटत रे.. सर्वात सुंदर भावनेला अनुभवुन बघ… नुसता तडफातडफी निर्णय घेऊ नकोस.. ह्या गोष्टींचा पण विचार एकदा का होइना करून बघ.. नुसतच काय जगायच.. जिवंतपणी मरण काय असते ते अनुभवुन बघ.. एक जखम स्वतः करून बघ.. स्वताच्या पायावर कुर्हाड़ मारून बघ.. नुसत सुखच काय अनुभवायचे.. दुखाच्या सागरात एक डूबकी मारून बघ.. विरहाच्या तलवारीचे घाव सोसून बघ.. थोड्या जखमा स्वतः करून बघ.. रिकाम काय चालायच..? आठवणीचे ओझे काय असते ते एकदा पेलुन बघ.. रडत असलेले डोळे लपवत.. एकदा हसण्याचा प्रयत्न करून बघ.. सोपं नसत रे…एकदा रडून बघ.. तुझ्या अश्रुंची चव चाखून बघ.. सांगण्याचा हेतु एवढाच की.. एकदा का होइना प्रेम करून बघ..

मैत्रीण माझी

मैत्रीण माझी नाजुक फुलासारखी वाऱ्याबरोबर डोलणाऱ्या इवलाश्या रोपटयासारखी हसण तिच खळखळणाऱ्या झऱ्यासारख मनही तिच त्यातील निर्मळ पाण्यासारख आहे ती अशीच अश्रुसोबत हसणारी मनातील वादळांना मनातच थोपवणारी भासते कधी आकाशातील चांदणीसारखी तर कधी सागराबरोबर खेळणाऱ्या लाटेसारखी तशी आहे ती माझ्यापासुन दुरवर तरीही अंतःरात रुतलेली खोलवर तुझ्या मैत्रीच्या छायेत मला क्षणभर विसावू दे हरलेi जरी मी, आपली मैत्री मात्र सदैव जिंकू दे

कारण हे वयच असं असतं....

कारण हे वयच असं असतं.... पकड घट्ट असते तरी वाळू निसटून जाते.. रेखाटलेल्या रांगोळीची सुंदर् आठवण रहाते.... कळत नाही मंतरलेले दिवस कसे सरतात... पिंपळ्पानी आठवणी मनात घर् करुन उरतात... सौंदर्य हे बघणा-याच्या नजरेमधेच असत....कारण हे वय असंच असतं..... कुठून येतं फुलपाखरू?? कुठे निघुन जातं ?? चिमटीत उरतो रंग तेव्हा रंगात फूलपाखरू दिसतं.... भिरभिरणारं कोवळं वय हळूच तिथं फसतं.....कारण हे वयच असं असतं.... सप्तरंगी स्वप्नांचे दिवस.. वाऱ्यासारखे निघून जातात.. जगाने दिलेल्या जखमांवर.. हळूवार फुंकर घालतात.. जगाच्या भुलवण्याला हे कसं फसतं..? कारण हे वयच असं असतं..

येथेच उभा आहे मी

येथेच उभा आहे मी तू येणार म्हणुन येथेच उभा आहे मी तू भेटणार या आशेवरच जगत आहे मी काय सांगू तुझ्याशिवाय कसा मी जगतोय रोज तुज्या भेटीच्या आशेवरच जगाशी लढतोय तू आज येशील उदया येशील येवून हे जीवन प्रेमाने बदलून टाकशील तू दाखविलेल्या स्वप्नात रमून आहे मी तू येणार म्हणुन येथेच उभा आहे मी सार्यानीच सांगितलय तुझी आश्या सोडून दे नाहीच येणार तू स्वप्न पहान सोडून दे पण माहित आहे मला शपथा तू तोडणार नाहीस उशिरा का होईना आल्यावाचून राहणार नाहीस तू येणार म्हणुन येथेच उभा आहे मी

जेव्हा मला कोणी माझ्यासार्खा भेटतो

जेव्हा मला कोणी माझ्यासार्खा भेटतो, मला कधी कळलच नाही की नेमक मला दुख कशाच आहे? ती मला सोडुन गेली याच्..की ती मला सोडुन गेली म्हनुन मला दुख झाल हे जगाला कळल नाही याच…. मेलेल्या बापालाही काही काळानंतर, माणुस विसरतोच ना…. मग पहिल प्रेम विसरण कठिण का?? कदाचित आपल्यालच ते विसरायच नसत सतत वाटत असत की सर्वाना कळाव, मी किती सहन केलय मी चांगला आहे.. प्रश्न ही माझाच असतो आणि उत्तर ही माझेच…… फक्त मी त्या व्यक्तीच्या शोधात असतो जो मला हव ते उत्तर सांगेल………… जेव्हा मला कोणी माझ्यासार्खा भेटतो, तेव्हा वाटत चला कुणीतरी मला समजत. किंबहुना ………………….. त्यालाही तसच वाटत असेल.. वाक्यही एकच असत आणि विचारही एकच असतात, फक्त ते वेगवेगळ्या ओठांतुन निघतात बस एवढेच……….