Posts

Showing posts from 2008

का? अचानक...........

का? अचानक........... असे हे दिवस बदलतात, क्षणात होत्याचे नव्हते करतात, दुखाना अचानक सुखात बदलतात, सुखाना अचानक दुखात बदलतात, का? अचानक............ मला थोड़े यश मिळताच, माझ्या यशावर जलू लागतात, माझ्या प्रगतिच्या वाटेवर, का असे काटे पसरवितात, का? अचानक............ जर माझी जबाबदारी वाढतेय, तर यांचे काय कमी होतेय, जरी मला वरुन मान मिळतोय, तरी यांना मी तरी कुठे कमी देतोय, का? अचानक............ कालपर्यंत माझ्या मदतीला येणारे, आज हाकेला दुर्लक्ष करतात, काय माझा दोष आहे, ज्याची मला शिक्षा देतात, का? अचानक............ अशी मानसे बदलतात, माझ्या चंगुलपनाचा फायदा घेतात, मी चांगले बोलतोय, मग ते का वाकडयात शिरतात, का? अचानक............ कालपर्यंत वरुन चांगले भासनारे, आज का मागुन सुरे खुपसतात, मी तोंडावरच चांगले वाईट बोलतो मग ते का मागुन वार करतात का? अचानक........ .. ...का? अचानक............

माझा एकांत आणि मी…

आजकाल इथं आम्ही दोघंच असतो .. माझा एकांत आणि मी. आजकाल तसं दुस-या कुणाशी फारसं पटत नाही.. तासन तास दोघं बोलत बसतो, निश्चल अंधाराच्या काठाशी, कधी मनात जपलेल्या वाटांशी.. पहाटे.. किरकिरं घड्याळ तुझी स्वप्नं गढूळ करतं, माझ्यासारखाच तेव्हा तोही चिडतो. मग मी घड्याळाला गप्प करतो. ‘आता स्वप्नांतही भेटणं नाही’, असंच काहीसं बडबडतो.. खिडकीचा पदर बाजूला सारतो, तिच्या डोळ्यांतलं चांदणं हसतं… तेव्हा त्याला मी हळूच सांगतो की ‘तिच्या’ डोळ्यांतही असंच काहीतरी असतं. तुझ्या डोळ्यांत हरवलेल्या मला तो पुन्हा मागे खेचतो.. मी पापण्यांतले थेंब वेचतो..

प्रेम

प्रेम करतोस ना तिच्यावर, मग कर फ़क्त प्रेमाचा वर्षाव, तिने ही कराव प्रेम म्हणून आणायचा नसतो दबाव.... असेल तिचा नकार, तर तो हि तू हसत स्विकार, तिलाही आहे ना स्वत:चा निर्णय घेण्याचा अधिकार... नाही म्हणाली तर तूझ्या प्रेमाने नकाराला होकारात बदल, का नाही म्हणाली याचा विचार करुन आधी स्वत:ला बदल... नाही म्हणाली तर तिच्या नकारावरही प्रेम कराव, नाही म्हणता म्हणता तिला प्रेम करायला शिकवाव... नको रे घेउस तूझ्या वेड्या हट्टा पाई तिचा बळी, काय मिळणार तूला तोडून एखादी उमलणारी कळी... खरे प्रेम करतोस ना, मग ठेव सच्ची निती, कशाला दाखवतोस उगाच तिला जिवाचि भिती... तूझे हे सच्चे रुप पाहून कदाचित बदलेल तिचा विचार, तिलाही होईल बघ मग तुझ्या प्रेमाचा आजार... अखेर तरीही नसेल तिचा होकार तर तूही घे अवश्य माघार, कशाला मांडतोस लेका असा एकतर्फी प्रेमाचा बाजार...

स्वप्ने

स्वप्ने ही आपलीच असतात ह्र्दयात त्यांना जपायची असतात फुलांसारखी फुलवायची असतात घरांसारखी सजवायची असतात कारण स्वप्ने आपलीच तर असतात रेशीम बंधाने त्यांना बाधायची असतात मनातल्या मंदीरात पुजायची असतात कधी कधी अश्रुंच्या पुरात वाहुन द्यायची असतात आठवणींच्या जगात कोठेतरी साकारायची असतात पुर्ण झाली नाहित तरी शेवटी स्वप्ने ही आपलीच असतात ह्र्दयात त्यांना जपायची असतात..........

अशी असावी ती

अशी असावी ती नाही भेटलो मी दिवसभर तर तीने खुप बैचेन व्हावं संध्याकाळी ऒफ़िसबाहेर भेटून मला अगदि सरप्राईज द्याव भेटण्यासाठी ठरलेल्या जागी तीने माझ्या आधी यावं आणि मी उशिरा आलो म्हणुन मग लटके लटकॆ रागवावं फ़िरताना जर मी नजरेआड झालो तर तीने कावरबावरं व्हावं आणि मी दिसल्यावर मात्र अश्रू लपवत मला प्रेमान ओरडावं माझं काही चुकलं तर तीन कधीही न रागवावं अबोला धरुन मला न रडवता काय चुकलं ते समजवावं जीची कल्पनाही केली इतकी भरभरुन प्रेम देणारी ती व्यक्ती असावी माझी आठवण आली तीला की तिनंही माझ्यासाठी एक कविता लिहाव

माणुस का चुकतो देवा

माणुस का चुकतो देवा का असा करतो वेडयासरखा , ईश्वराचा अंश त्यात असूनही का वागतो राक्षसासारखा......... माणुस का चुकतो देवा का करतो एवढी दुसरयाची निंदा.. दुसरयांतील दोष शोधण्यात स्वतःला हरवून बसतो कितींदा.......... माणुस का चुकतो देवा का तो माणसातल्या माणूसकीला ही विसरत चाललाय... धर्म,जात,पंथ यांच्या नावाखाली माणुसकीलाच काळिमा फासत चाललाय माणुस का चुकतो देवा का आज माणसाला माणुसच नकोसा झालाय तुच बनवलेल्या ८४ लाख योनीतील प्रत्येक जीव मात्र माणसाचा जन्म घ्यायला आतुर झालाय माणुस का चुकतो देवा का असा चुका करतो जाणुनबुजुन.... चुकीचं करतोय माहित असुनही चुकीच्या गाळलेल्या जागा भरत राहतो बरोबर म्हणुन... माणुस का चुकतो देवा का धरतीवरील प्रत्येकाला चांगलच नाही बनवलसं. कि तू ही माझ्यासारखा तुळ राशीचा म्हणुन तराजुने चांगल्यालाही वाईटाने मोजुन मापुनच पाठवलेस... माणुस का चुकतो देवा का पण माणसाला तु बनवलस.. तुला ब्रम्हांडात रहावेना एकटे म्हणुन करमणुकीचं साधन तर नाही ना घडवलंस...............????????????

एक दिवस असा होता की

एक दिवस असा होता की कुणीतरी माझ्या फोनची वाट पहायचं स्वतःच फोन करुन मनसोक्त बोलायचं त्या गोड गप्पामध्ये रंगायचं एक दिवस असा होता की कुणीतरी तासनतास माझ्याशी गप्पा मारायचं गप्पा तशा कमीच पण फ्लर्ट जास्त व्हायचं मनमोकळेपणानं सर्व काही सांगायचं एक दिवस असा होता की कुणीतरी मला भेटण्यासाठी बोलवायचं वेळेअभावी कामामुळे कधीच नाही जमायचं फोनवर मात्र तीन तीन तास बोलायचं एक दिवस असा होता की कुणीतरी माझ्यासाठी झुरायचं पण माझं यातनामय जीवन त्याला कसं सांगायचं मग काय , विहिरीतील कासव बघायचं आज दिवस असा आहे की कुणीतरी विणाकारण मला टाळायचं नसलेलं काम सबब म्हणून सांगायचं वेळ देऊनही फोन नाही करायचं आज दिवस असा आहे की मी माझं नातं मनापासुन जपायचं मिळालेल्या वागणुकितुन मन मात्र दुखायचं पण माझं हे दु:ख कोणाला कळायचं आज प्रश्न असा आहे की का कुणाशी स्वार्थासाठी नातं जोडायचं का प्रेमाचं नाव घेऊन ताळ तंत्र सोडायचं का स्वतःचं व दुस-याचं जीवन भकास करायचं मित्रा , आपल्याल नाही हे जमायचं दु:खातही आपण मात्र हसायचं कधी कधी एकांतजागी खुप खुप रडायचं चेह-यावर चेहरा लावुन जगायचं!

नाते तुझे हळुवार जपायचे

नाते तुझे हळुवार जपायचे, आठवण आली की अलगद उमलायचे, नको करूस अट्टाहास, सांग कधी भेटायचे, दरवेळी मात्र मीच वीचारायचे, तु फक्त हो म्हणायचे, सागं आठवण आली की काय करायचे? मन मात्र तुझ्याभोवती घुटमळायाचे, या वेडयामनाला कोन समजावयाचे? सागं आठवण आली की काय करायचे? तुझ्या जवळ बसले असता मनं कधी गप्पा मारायचे. मनातले हे बोल सांग कधी कळायचे? सागं आठवण आली की काय करायचे? नाही भेटले की डोळे अलगद ओले करायचे, सैर वैर झालेल्या मनाला गप्प मात्र मीच करायचे, येऊन घेशील मिठीत असे मीच म्हणायचे, सागं आठवण आली की काय करायचे? फोन मात्र मीच करायचं, H.....R... U मत्र तू बोलायचे, तु दिसला की डोळे भरुण पहायचे, ऊघडले डोळे की ते मत्र स्वपनच ठरायचे, सागं आठवण आली की काय करायचे?.......

........तुझ्या दोन शब्दांनी...

Image
पाहिले प्रथम तुला , पापणी बंद होईना... हरवून गेलो कुठे , मी मलाच गवसेना... कल्पनेच्या कुंचल्याने साकारलेली तुझी छबि... परि तव लोचनी मी , पाहिली माझीच छबि... काहीसं पुटपुटलीस , सांगू ना शके शब्दांनी... मनात तार छेडली , तुझ्या दोन शब्दांनी... गोपाळकृष्णाची बासुरी , बोटें राधेची तयावरी.... स्वरांनी धुंदी चढली , कंपने त्यांची हृदयावरी... तुझी मधुर गोड वाणी निर्झरासम मोकळे मन... खळखळतांना अनुभवले. तव ते निष्पाप मन....

आपुलाच वाद आपणाशी . . .

निसटून गेलेले क्षण येत नाहीत परत ... आपण त्यांच्या मागे धावतो खुळ्यागत ..... पळत सुटलो तरी नाही काही हाती लागत ... आपण मात्र एकटेच बसत बसतो कुढत .... उद्विग्न होता आपण सारे दूर पळतात... दुरावा आला म्हणजे संवाद ही हरवतात .... आपल्या मनाचा आवाज ऐकता आला पाहिजे ... उत्स्फुर्तता टिकवून स्वसंवाद झाला पाहिजे .... मन व शरीर यांच्या संवेदना जाणवू या... स्वत:ला व्यक्त करण्यास्तव कामास त्यांना लावू या....

बा॓लताना जरा सांभाळून...

बा॓लताना जरा सांभाळून... शब्दाला तलवारीप॓क्षा धार असत॓, फरक फक्त एवढाच की, तलवारीन॓ मान तर, शब्दांनी मन कापल॓ जात॓ जरी तलवारीच्या जखम॓तून रक्त आणि शब्दांच्या जखम॓तून अश्रू... य॓त असल॓ तरी, दा॓घांपासून होणारी व॓दना मात्र सारखी असत॓. म्हणून सांगतो शब्द जरा सांभाळून... शब्दाला तलवारीप॓क्षा धार असत॓ शब्दच माणसाला जोङतात आणि शब्दच माणसाला तोङतात ह॓ शब्दच आह॓त, त॓ कधी रामायण तर कधी महाभारत रचतात तुझ्या एका शब्दावर माझ॓ सर्वस्व अवलंबून आह॓ तुझ्या एका शब्दावर माझ॓ हसण॓ तर, तुझ्या एका शब्दावर माझ॓ रडण॓ अवलंबून असत॓. म्हणून म्हणतो शब्द जरा सांभाळून... शब्दाला तलवारीप॓क्षा धार असत॓...

आज वेळ नाही....

आज वेळ नाही.... अमाप सुख आहे सगळ्यान्च्याच पदरात पण ते अनुभवयला आज वेळ नाही..... आईच्या अन्गाईची जाणिव आहे पण आईला आज 'आई' म्हणायलाच वेळ नाही..... सगळी नाती संपवुन झालीत पण आज त्या नात्यान्ना पुरायलाही आज वेळ नाही..... सगळ्यान्ची नाव मोबाईल मध्ये सेव आहेत पण प्रेमाचे चार शब्द बोलायलाही आज वेळ नाही..... ज्या पोराबाळान्साठी मेहनत दिवस-रात्र करतात त्यान्च्याकडे क्षणभर बघायलाही आज वेळ नाही.... सान्गेल कोण कशाला दुस-याबद्द्ल जेव्हा ईथे स्वतःकडेच बघायला वेळ नाही...... डोळ्यावर आलीये खुप झोप पण आज कोणाकडे झोपयलाही वेळ नाही..... ह्रुदयात वेदनान्चा पुर वाहतोय पण त्या आठवुन रडायलाही वेळ नाही.... परक्यान्ची जाणिव कशी असेल जर ईथे आपल्याच माणसान्साठि वेळ नाही... आयुष्यात पुढे जाण्यासाठी चाललेल्या या संघर्षात जरा माग वळुन पहायलाही वेळ नाही........ अरे जीवना तुच सान्ग जगण्यासाठीच चाललेल्या या धावपळीत जगायलाच आज वेळ का नाही?

रडवणं असतं अगदी सोपं

रडवणं असतं अगदी सोपं बघा जरा कुणाला हसऊन टाके घालायला वेळ लागतो सहज टाकता येतं उसऊन निर्धार पाळायला निश्चय हवा कारण नाही लागत मोडायला क्षणार्धातच रेघ मारता येते वेळ लागतो ती नीट खोडायला नाकारणं एक पळवाट असते सामोरं जाउनच होतो स्विकार कर्तव्यासाठी लागतोच त्याग हक्क करतात नुसती तक्रार एकदा पाडुन फोडलेले कप कधिच सांधता येत नाहीत एकदा दुरावलेली मने मग पहील्यासारखी होत नाहीत हार मानली की सारंच संपलं जिंकण्यासाठी लढायलाच हवं मरण तर काय क्षणाचा खेळ जगण्यासाठी झगडायलाच हवं

दिवस अखेरचा...

आज अखेर तो दिवस आला भेटणार शेवटचे प्रत्येकाला... ओठावर होते प्रत्येकाच्याच हसु... डोळ्यात मात्र भरलेले काठोकाठ अश्रु... कुणी झालेल्या चुकांची माफ़ी मागत होता.. तर कुणी केलेल्या मजा-मस्तीची उजळणी करत होता... आठवत होता प्रत्येकजण क्षण आणि क्षण... ते कॅन्टीन मधे बसणं, लेकचर बंक करणं, सिनेमाला जाणं नाहितर कॉलेजबाहेरच्या कट्ट्यावर बसून टाईमपास मरणं... किती पटकन सारं काही बदललं.. ३-४ वर्ष निघुन गेली हे आजच कळलं... व्हॅलेंटाईन डे अन फ़्रेन्डशिप डे येतील अजुनही पण मजा नसेल आज नंतर त्याला तशी.... कितितरी आज इथे ह्या जागी सोडून जावं लागणार... रोज सोबत राहणारे मित्र-मैत्रिणी आता कधीतरीच भेटणार.... प्रत्येक जण आजचा हा दिवस जगून घेत होता कारण आज कॉलेजचा शेवटचा दिवस होता....

आई-आई आता माझं लगिन लावुन दे..!!

आई-आई आता माझं लगिन लावुन दे..!! माम्या-मावश्या छेड-खानी करतात माझी आई-आई तू चांगलं त्यांना रागवून दे म्हणा पोर अजुन लहान माझं लगिन लावत नाही, सुपडं वाजवून दे... तुला मैत्रीणी पूसतील माझ्या मुलीशी तुझ्या मुलाचं लगिन लावुन दे मुलगा माझा गोंडस त्याच्या समोर मुलगी तुझी नकटी सरळ सांगुन दे... माम्या-मावश्यांनी नाही एकलं तरी सुध्दा तर शोधायला मुली त्यांना सांगुन दे आणतिल शोधून तेंव्हा मात्र काळी-ठेंगणी अस कारण सांगुन नापसंत करुन दे.. तुझ्या आवडीची दादासाठी शोधुन आणली वहिनी सारखीचं मुलगी मलाही शोधुन दे आई-आई वहिनीच्या लहान बहिणीशीचं आता माझं लगिन लावुन दे...

मृगजळ

तिनं नाही म्हटलं आणि त्यानं मन आवरलं अनावर भावनांना कसबसं सवरलं हळुवार स्वप्न आणि मनाचे कित्तेक खेळ सुखाचे झालेले भास आणि हळवी कातरवेळ आता फक्त आठवत रहात तिचं फक्त स्वप्नातच त्याच असणं आणि हेच होतं कदाचित त्याचं मृगजळला फसणं

घोडं

हे असं कसं घडलं तुझ्यावर प्रेम कसं जडलं सरळ मार्गी जाता जाता गाडं कसं गडगडलं मी माझा म्हणता म्हणता तुझाच म्हणणं कसं काय घडलं खोटी ऐट दाखवता दाखवता अचानक प्रेमांत कोण पडलं आता प्रेम केलंच आहे तर घोडं कुठे अडलं नाही नाही म्हणता म्हणता शेवटी केलन् ना लग्न करून करून कोण किती करील उपस्थित विघ्न

आयुष्य असचं जगायचं असतं............

जे घडेल ते सहन करायचे असतं, बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं आयुष्य असचं जगायचं असतं कुठून सुरु झालं हे माहीत नसलं तरी, कुठतरी थांबायचं असतं, आयुष्य असचं जगायचं असतं कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं, स्वत च्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचे असतं आयुष्य असचं जगायचं असतं दु ख आणि अश्रुंना मनात कोडुन ठेवायचं असतं, हसता नाही आलं तरी हसवायचं असतं, आयुष्य असचं जगायचं असतं पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं, आकाशात झेपावुनही धरतीला विसरायचं नसतं, आयुष्य असचं जगायचं असतं मरणानं समोर येउन जीव जरी मागितला तरी मागुन मागुन काय मागितलसं असचं म्हणायचं असतं, आयुष्य असचं जगायचं असतं इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं, पणं जग सोडताना मात्र समाधानानं जायचं असतं, आयुष्य असचं जगायचं असतं आयुष्य असचं जगायचं असतं............

मैत्री

एकही मित्र नाही असा माणूस कुठेच नसेल थोड्या पुरती का होईना प्रत्येकाने मैत्री केली असेल शरीरात रक्त नसेल तरी चालेल पण आयुष्यात मैत्री ही हवीच कितीही जुनी झाली तरी ती नेहमी वाटते नवीच रक्ताच्या नात्यात नसेल एवढी मैत्रीच्या नात्यात ओढ असते कशीही असली तरी शेवटी मैत्री गोड असते. मैत्री म्हणजे त्याग आहे मैत्री म्हणजे विश्वास आहे हवा फक्त नावापुरती तर मैत्री खरा श्वास आहे मैत्रीच्या या नात्या बद्दल लिहिण्यासारखे खूप आहे खरे नात्याला नसले तरी मैत्रिला एक रूप आहे मैत्रिला कधी गंध नसतो मैत्रीचा फक्त छंद असतो मैत्री सर्वानी करावी त्यात खरा आनंद असतो

डोळ्यातील अश्रू पडतात

तेव्हा त्यांचा आवाज होत नाहि याचा अर्थ असा नाहि की तु दुरावल्यावर मला दुःख होत नाहि शब्दांनाहि कोड पडावं अशीही काही माणस असतात किती आपलं भाग्य असत जेव्हा ती आपली असतात कुणीच आपल नसतं मग आपण कुणासाठी असतो आपलं हे क्षणिक समाधान इथ प्रत्येक जण एकटा असतो डहाळीवरूण ओथंबणारे पावसाचे थेंब उगाचच का अडकून बसतात काहि क्षण फ़ाद्यांशी नातं जोडून किती निष्ठूरपणे सोडून जातात नजरेत जे सामर्थ्य आहे ते शब्दांना कसे मिळणार पण प्रेमात पडल्याशिवाय ते तुम्हाला कस कळणार जिवनात काहितरी मागण्यापेक्षा काहितरी देण्यात महत्व असत कारण मागितलेला स्वार्थ अन दिलेलं प्रेम असतं शब्दांनी कधितरी मझी चौकशी केली होती मला शब्द नव्हे त्यामागची भावना हवी होती स्वप्नातील पावलांना चालणे कधी कळलेच नाहि पाऊलवाट चांगली असली तरी पाऊल हे वळलेच नाही अस्तित्वाची किंमत दूर गेल्याशिवाय कळत नाही, सगळ कळतय मला पण तुला सोडून दुरही जाववत नाही कधी कधी जवळ कुणीच नसावसं वाटतं आपलं आपण अगदी एकट असावसं वाटत....

भोगले जे......

भोगले जे दुःख त्याला, सुख म्हणावे लागले एवढे मी भोगिले की मज हसावे लागले ठेविले आजन्म डोळे, आपुले मी कोरडे पण दुजांच्या आसवांनी, मज भिजावे लागले लोक भेटायास आले, काढत्या पायासवे अन अखेरी कुशल माझे, मज पुसावे लागले गवसला नाहीच मजला, चेहरा माझा कधी मी कशी होते मलाही आठवावे लागले एकदा केव्हातरी मी वचन कवितेला दिले राखरांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले

नशीबवान तर ..........

नशीबवान तर सगळेच असतात नशीबाला बदलणारा एखादाच असतो हसतमुख तर सगळेच असतात दुसर्याला हसवणारा एखादाच असतो मर्त्य तर सगळेच असतात कर्तुत्ववान अमर एखादाच असतो चमकणारे कजवे बरेच असतात प्रखरतेने उजळणारा एखादाच असतो सुखचे सोबती सर्वच असतात दुःखचा साथीदार एखादाच असतो अनुभवाने शहाणे बरेच असतात अनुभवालाही शाहाणा करणारा एखादाच असतो जाळणारे बरेच असतात मेणबत्तीप्रमाणे जळणारा एखादाच असतो झेपेल तेव्ह्ढच दुख: तो आपल्याला देतो, दिलेलं दुख: संपलं, की आपल्यालाच नेतो!!! दिवस असे की कोणी माझा नाही, अन मी कोणाचा नाही.

नाती

नाती नाती असतात किती विचित्र आणि मजेशीर !!! काही अगदी जवळची, तर काही अशीच वरवरची... नाती काही क्षणातच जुळणारी, तर काही अनेक वर्षातही न जाणवणारी... काही नात्यांना देता येत नाही नाव, तरीही ती असतात खूपच खास ! काही नाती ह्रुदयात घर करून रहणारी, दूर राहूनही कधीच न तुटणारी... मात्र काही नाती तुटल्यानंतरही, जन्मभर आठवत राहणारी ........

अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

गंध आवडला फुलाचा म्हणून फूल मागायचं नसतं अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं.... परक्यांपेक्षा आपलीच माणसं आपल्याला नेहमी दगा देतात एकमेकांच्या पाठीवर मग् नजरे आडून वार होतात भळभळणा-या जखमेतून विश्वास घाताचं रक्त वाहतं छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा आपणच पुसायचं असतं अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं.... आपलं सुःख पाहण्याचा तसा प्रत्येकाला अधिकार आहे.. पण्; दुस-याला मारुन जगणं हा कुठला न्याय आहे... माणूस म्हणुन माणसावर खरं प्रेम करायचं आपल्या साठी थोडं, थोडं दुस-यासाठी जगायचं जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं.... आपल्याला कोणी आवडणं हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं आकर्षणाचं स्वप्नं ते आकर्षणंच असतं... मान्य आहे, आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं... पण् जे चकाकतं ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं मन् आपलं वेडं असतं वेडं आपण व्हायचं नसतं.. मन मारुन जगण्यापेक्षा वेळीच त्याला आवरायचं अशावेळी.... आणि अशाच वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

सारं काही नकली आहे...

शिकण्यात काही मजा नाही , इंजिनिअरींग सारखी सजा नाही , अभ्यासाला तर रजा नाही , जागा आमची चुकली आहे , अहो , सारं काही नकली आहे. आम्हाला तर आहेत दोनच हात , तरी सबमिशन करतो रातोरात , शिव्या खाऊन काढतो दात , लाज अब्रु विकली आहे , अहो , सारं काही नकली आहे. ओरल पुरता नमस्कार , बाहेर येताच शिव्याचार , हा तर म्हणे शिष्टाचार कर्तबगारी खचली आहे , अहो , सारं काही नकली आहे. करुनी एवढी दरी पार , आमची म्हणे बोथटच धार , नोकरीस फिरतो दारोदार , आशा आता थकली आहे , अहो , सारं काही नकली आहे।

सहज बोलताना

सहज बोलताना तुझी बात आली जुन्या सावल्यांची जुनी रात आली हसलो जरी मी अश्रू फसवून गेले तुझ्या आठवांची बरसात झाली... म्हटले कुणी , " ती मौजेत आहे" , चला एकदाची खबरबात आली... खरे सांग माझे कसे पाप झाले का माझ्या स्मृतींना अशी मौत आली ? लक्ष्मीचीच होती तुझी पाऊले जी कुणा पुण्यवंताच्या दारात गेली...

अबोल प्रेम

वेदश्री हे फक्त माझ्याचसोबत नेहमी असंच घडणार आहे? तुझ्याबरोबरची प्रत्येक भेट 'ते' न बोलताच संपणार आहे? भेट-वेळ रोजची ठरलेलीच तरी अजून काय ठरणार आहे? बोलायचं पटकन पण वेडं मन त्याचाही मुहुर्त पाहणार आहे ! भेटतो तेव्हाच माहित असतं निघायची वेळ येणार आहे पटकन विचारावा प्रश्न हवासा तर शब्द ओठीच अडणार आहे ! मी न विचारताच तू काय हवं ते उत्तर देणार आहे? हे पुरतं कळतंय तरीही तोंड माझं का बोलणार आहे? न बोलता बोललेले शब्द तुला वेड्याला कळणार आहे? मी बोलले/न बोलले तरी गप्पच नेहमीसारखा तू राहणार आहे ! भावभावना समजून घेणं सगळंसगळं थांबणार आहे उष्ट्या कुल्फीची चव मात्र जिभेवरती रेंगाळणार आहे स्वप्न माझं हे संपलं तरीही मनात तूच उरणार आहे तुझ्यात मी नसले तरी माझ्यात तूच सापडणार आहे !

उगाचच...

एकदा कधी चुकतात माणसं, सारंच श्रेय हुकतात माणसं... प्रेम करुन का प्रेम कधी मिळतं, सावकाश हे शिकतात माणसं... गंधासाठी दररोज कोवळ्या, कितीक फुलांस विकतात माणसं शतकानुशतके कुठलीशी आस, जपून मनात थकतात माणसं... जुनाट जखमा भरू लागल्या की, नवीन सिगार फुकतात माणसं... हरेक पाकळी गळुनिया जाते अन अखेरीस सुकतात माणसं... नको रे असं कडू बोलू 'शता'.. उगाचच किती दुखतात माणसं !!!

आई खूप एकट वाटत आहे ग!!

आई खूप एकट वाटत आहे ग!! समुद्रात बुडाल्यासारख... जंगलात हरवल्यासारख... वदलात सापदल्यासारख... आई खूप घाबरयाला होत आहे ग!!! अंधारात कोंडल्यासारख... भूताने पछाड़ल्यासारख... धरती कंपल्यासारख... नवजीवन शोधण्याच्या वेडात.. तुला सोडून आलो.., काय मिळवल माहित नाही.. पण स्वताहाला मात्र गमावून बसलो.., आई परत येतील का ग ते क्षण ... परत फिरवशील का ग हात माझ्या डोकया वरून.. परत घेशील का ग मला तुझ्या कुषित.. परत शोधून देशील का मला .... माझाच मी... गोंधळलेला

आई, तू आहेस म्हणूनचं माझ्या.....

आई, तू आहेस म्हणूनचं माझ्या अस्तित्वाचं इथे नांदणं आहे संस्कारांच्या असंख्य चांदण्यांनी हृदयाच्या आभाळभर गोंदणं आहे आई, तुझ्या रागवण्यातही अनूभवलाय वेगळाच गोडवा तुझ्या मायेच्या नित्य नव्या सणात फिका पडतो दसरा नि पाडवा आठवतं तापाने फणफणायचो तेव्हां तू रात्रभर कपाळावर घड्या घालायचीस सर्वत्र दिवे मिणमिणू लागायचे, तरी तुझ्या डोळ्यातली ज्योत एकटीच लढायची एकदा जरासं कुठे खरचटलो आई, किती तू कळवळली होतीस एक धपाटा घालून पाठीत जख्मेवर फुंकर घातली होतीस जख्मं ती पुर्ण बुजली आता हरवून गेली त्यावरची खपली तो धपाटा, ती फुंकर, ती माया ती हरेक आठवण मनात जपली आई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम हृद्याच्या किती कप्प्यात साठवू मी कितींदा नव्या हृदयाचा संदेश देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मी आई, हजार जन्म घेतले तरी एका जन्माचे ऋण फीटणार नाही आई, लाख चुका होतील मज कडून तुझं समजावनं मिटणार नाही आई, करोडोंन मध्ये जरी हरवलो तरी तू मला शोधून काढशील आई, तुला एकदाच हाक दिली तरी अब्जांनी धावून येशील

आई, तू होतीस म्हणून...

आई, तू होतीस म्हणून... शब्द मिळाले निरर्थक बडबडीला संस्काराचे आकार आले आई, तू होतीस म्हणून... धैर्य आले ओल्या सुक्या जखमा पुसत परत खेळायचे तंत्र जमले आई, तू होतीस म्हणून... रडले नाही दांडगाईच्या खोडिला युक्तिचा जोडा मारुन हसत हसत घरी आले आई, तू होतीस म्हणून... गणित जमले जो आपला त्याला हातचा राखत उरलेल्यांना वजा केले आई, तू होतीस म्हणून... मी झाले मुळांशी नातं जपताना फांद्यांना नवे आकार दिले

बाबा (एक आर्त हाक)

बाबा (एक आर्त हाक) (हि कविता माझ्या स्व.बाबांसाठी. माझी हाक त्यांनी ऐकावी हीच ईच्छा.) लोक म्हनतात, "मूलगा- अगदी बापावर गेलाय, बिचारा पोरं तो, बपाविना वाढलाय." खरच का हो बाबा, मी तूमच्या सारखा दिसतो? तुमच्या विना खरच मी, बिचारा का हो वाटतो? तूमच्याकडून शिकन्यासारखं- बरंच काहीं होतं, ते समजन्याईतकं आमचं- वयं मात्र नव्हतं. आईच्या नजरेत- तूमचीच मूर्ती दिसते, तूम्हाला येवुन बिलगावं, ईच्छा सतत होते. कित्तेक लोकं तूमची- अजुनही आठवन करतात, तुम्ही केलेल्या उपकारांची जान ते ठेवतात. बाबा तुम्ही गेल्यावर ईथे सगळच बदललंय आपल्याच लोकांनी दार बंद केलय. ज्य मनसांना, तुम्ही- सूखी जग दिलं तूमच्या लेकरांना त्यांनी- वार्यावर सोडलय. बाबा तूमचा हा पोरं तूमच्या सारखाच होईल, पून्हा एकदा शून्न्यातून विश्व नीर्माण करील. बाबा तूमचा आर्दश डोळ्यांपूढे ठेवलाय तूमच्या पावूल खूनांवर- मी पाय ठेवलाय. बाबा मला तूमच्याशी खूप-खूप बोलायचंय एकादातरी तूम्हाला, डोळे भरून पहायंचय. एकदातरी बाबा माझ्या स्वप्नात या, एकदातरी बाबा मला मीठीत घ्या.

आई.....

पहिला शब्द जो मी उच्चारला, पहिला घास जीने मला भरवला, हाताचे बोट पकडून जीने मला चालवले, आजारी असताना जीने रात्रंदिवस काढले. आठवतय मला, चूकल्यावर धपाटा घातलेला, भूक लागली आहे सांगताच, खाऊचा डब्बा पुढे केलेला. अनेकदा तिने, जेवणासाठि थांबायचे, आणि मी मात्र न सांगताच, बाहेरून खाऊन यायचे. कधी कधी रागाच्या भरात, उलटहि बोललोय, आणि मग चूक समजल्यावर, ढसा ढसा रडलोय. तिने सुद्धा माझे बोलणे, कधीच मनावर नाहि घेतले, मागाहून घालवलेले माझे अश्रू, पदराने पुसून टाकले. माझी स्तुती करताना, ती कधीच थांबत नाहि, अन माझा मोठेपणा सांगतान, तिच्या आनंदाला पारावर ऊरत नाहि. माझा विचार करणे, तिने कधिच सोडले नाहि, माझ्यावर प्रेम करण्याला, कधीच अंत नाही. मी सुद्धा ठरवले आहे, तिला नेहमी खुश ठेवायचे, कितीहि काहि झाले तरी, तिला नाहि दुखवायचे. आईची महानता सांगायला, शब्द कधीच पूरणार नाहि, तिचे उपकार फ़ेडायला, सात जन्म सुद्धा शक्य नाहि

आई

दिवसभर कितीही दंगा केला तरी मला थोपटल्याशिवाय आई कधी झोपली नाही घरापासुन दूर आता म्हणूनच कदाचित शांत झोप कधी लागली नाही कुणी विचारतं .. "तुला घरी जावसं वाटत नाही?" कसं सांगू त्यांना, घरातून निघताना आईला मारलेली मिठी सोडवत नाही आई, तू सांगायची गरज नाही तुला माझी आठवण येते आता माझ्यासाठि डबा करायचा नसतो तरीहि तू सहा वाजताच उठतेस तुझ्या हातचा चहा तुझ्या हातची पोळी तुझ्या हातची माझी नावडती भाजीही खायला आता जीभ आसुसली घरापासून दूर ... आई जग खूप वेगळं आहे तुझ्या सावलीत अगदी बिंनधास्त होते आता रणरणंत ऊन आहे तू आपल्या पिलांसाठी सगळं केलंस ... एक दिवस पिलं म्हणाली, "आई आता आम्हाला जायचंय" ... आणि तू त्यांना जाऊ दिलंस आई, तू इथे नाहीस बाकी माझ्याकडे सगळं आहे घरापासून दूर जग खूप वेगळं आहे

बाबा

आई वर कविता सारेच लिहितात बाबानवर का कोणी लिहीत नाही बाबाही आई एवढेच प्रेमळ असतात हे कोणालाच का पटत नाही बाबानाही वाटत मनापासून सार्‍यानी आपल्याशीही खूप बोलाव रात्री उशिरा घरी आलो म्हणून काय झाल पोरानी आपल्याही कुशीत निजाव करतात ते सार फक्त आपल्यासाठी बाबा फक्त ते कधी बोलून दाखवत नाही आई एवढ आपण कधी बाबाना सातावत नाही ते रागावतील म्हणून त्यांच्याशी बोलतच नाही आणि म्हणे पालक मूल यांच्यातला संवाद संपत चाललाय विचारा स्वतला बाबांशी शेवटच कधी बोललाय ( सर्व बाबांसाठी ) **रमेश **

आईलाही मन असतं

आईलाही.... (आई तुझ मन, तुझ्या आशा,तुझं महात्म्य समजुन घेन्यासाठी आम्हि खरच लहान आहोत.) आईलाही 'मन' असतं, अम्हाला कधी समजलंच नाही तिचं सूध्धा 'स्वप्न' असतं,अम्हाला ते कळालंच नाही 'आई' राबते दिन्-रात्र, आम्हाला घडवण्यासाठी आम्ही असतो विचार मग्न, आमुच्याच स्वार्थासाठी आईच 'श्रेष्ठ गुरु' असते, अम्हाला कधी समजलंच नाही तीच आमुचा आधार असते, अम्हाला ते कळालंच नाही 'आई' झोपते उपाशी पोटी, आमचं पोट भरण्यासाठी आम्ही सदा पैशे उडवतो, अमुच्याच हवसेपोटी आईच्या सूध्धा 'आवडी' असतातं,अम्हाला कधी समजलंच नाही तिलां सूध्धां 'हसायचं' असतं, अम्हाला ते कळालंच नाही 'आई' नेसते फाटकं लुगडं, आम्हाला सजवन्यासाठी आम्ही सादा रागावतो तिच्यावर,आमुच्याच चूकीसाठी आईलाही 'जगायंचं' असतं, अम्हाला कधी समजलंच नाही तीच खर 'धन' असतं,अम्हाला ते कळालंच नाही. आईलाही मन असतं, अम्हाला कधी समजलंच नाही तिचं सूध्धा स्वप्न असतं,अम्हाला ते कळालंच नाही रमेश ...........sanaramesh@gmail.com

आई

आई आई साठी काय लिहू आई साठी कसे लिहू आई साठी पुरतील एवढे शब्द नाहीत कोठे आई वरती लिहीण्याइतपत नाही माझे व्यक्तिमत्व मोठे जीवन हे शेत तर आई म्हणजे विहीर जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाटी जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी आई तू उन्हामधली सावली आई तू पावसातील छ्त्री आई तू थंडीतली शाल आता यावीत दु:खे खुशाल आई म्हणजे मंदिराचा उंच कळस आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी आई म्हणजे वाळवंटात प्यावं तसं ठंडगार पाणी आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबध्द टाळी आई म्हणजे वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी.